विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदू एकवटला आणि भगवा गुलाल उधळला…

0
29

अहिल्यानगर : विधानसभा निवडणूक सुरू होण्या अगोदरच ब्राह्मण समाजाने मेळावा घेऊन सर्वात प्रथम पाठिंबा दिला आणि माझा प्रचार देखील केला आहे. शहराच्या विकास कामाबरोबरच हिंदुत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. ब्राह्मण समाजाच्या वतीने शहरात श्री भगवान परशुराम यांचे भव्य मंदिर उभे राहत असल्यामुळे वर्षभरात फोटोचे रूपांतर मूर्तीमध्ये होणार आहे. निवडणुका येत असतात आणि जात असतात. त्यामुळे काही लोक फक्त जत्रेतल्या पाहुण्यासारखे येतात आणि जातात मात्र आम्ही पाचही वर्ष समाजामध्ये काम करत असतो नगरकर हुशार असून त्यांनी देखील काम करणाऱ्यालाच संधी दिली आहे. या निवडणुकीमध्ये ब्राह्मण समाजाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. हिंदू वर्ग देखील जागा झाला असून त्यांनी लोकसभेची चूक दुरुस्त केले आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदू एकवटला आणि हिरव्या गुलाला ऐवजी भगवा गुलाल उधळला. राजाभाऊ पोतदार यांनी ब्राह्मण समाज एकसंघ करण्याचे काम केले आहे ह.भ.प मंदार बुवा रामदासी यांचा राजकारणाशी कुठलाही संबंध नसताना माझ्या साठी व हिंदुत्वासाठी काम केले आहे शहरामध्ये अध्यात्मिकता वाढीसाठी काम केले जाईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
सकल ब्राह्मण समाज महासंघ अहिल्यानगर यांच्या वतीने आमदार संग्राम जगताप तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ह.भ.प मंदार बुवा रामदासी, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पोतदार, दत्तोपंत पाठक गुरु, डॉ.एस.व्ही जोशी, सुधीर भापकर, ह.भ.प प्रभाताई भोंग, सुरेश शिरसागर, एन.डी कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, नंदकुमार पोळ, अभिनेते मोहिनीराज गटणे, राजाभाऊ आडकर, राजेश भालेराव, विलास देशमुख, प्रियाताई जानवे, वंदना पंडित, श्याम रेणावीकर, मोरेश्वर मुळे, कालिंदी केसकर, चेतन वसगढेकर, विजय देशपांडे, प्रमोद कुलकर्णी, किरण वैकर, मंगेश निसळ, दी.ना जोशी, योगेश दानी, सुवर्णा महापुरुष आदीसह ब्राह्मण समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
राजाभाऊ पोतदार म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाचा जल्लोष ब्राह्मण समाजाने केला आहे. आम्ही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केले आहे. कारण मा.आमदार अरुण काका जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांनी नेहमीच सामाजिक कार्याची भूमिका यशस्वीपणे पार पाडली आहे. शहरांमध्ये श्री भगवान परशुराम यांचे मंदिर उभे राहावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी प्रयत्न केले व आम्हाला जागा दिली लवकरच मंदिराचे कामही पूर्ण होईल. सकल ब्राह्मण समाज महासंघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा नागरिक सत्कार मोठ्या उत्साहात व मंत्रमुग्ध आशीर्वादाने संपन्न झाला असल्याचे ते म्हणाले
एन डी कुलकर्णी म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिले आहे की एकही सभा न घेता निवडणूक जिंकली. व्यक्तिगत संपर्क मोठा असल्यामुळे पक्षीय राजकारणापेक्षा आमदार संग्राम जगताप यांच्या कामाला लोकांनी मते दिली असल्याचे ते म्हणाले