अहमदनगर गुरुमाऊली – गुरुकुल मंडळात प्रवेश करत आहोत. शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली काम करू असे सांगत प्राथ शिक्षक बँकेच्या ११ संचालकांनी व गुरुमाऊली मंडळ जिल्हाध्यक्ष सुरेश निवडूंगे ‘ राजकुमार साळवे , किसन खेमनर व शेकडो कार्यकर्त्यांनी तांबे गटाला कायमची सोडचिठ्ठी दिली .
राज्य प्राथ. शिक्षक संघाचे राज्यनेते संभाजीतात्या थोरात , राज्यउपनेते रावसाहेब रोहकले ‘ संपर्कनेते डॉ . संजय कळमकर , राष्ट्रिय सरचिटणित बाळासाहेब झावरे , राज्यसरचिटणिस आबासाहेब जगताप ‘ रावसाहेब सुंबे , अविनाश निंबोरे,सुदर्शन शिंदे ‘ नारायण राऊत ‘ जयश्री झरेकर , संगिता कुरकुटे ‘ नितिन काकडे ‘ राम निकम ‘ अरुण आवारी ‘ गजानन जाधव , बाळासाहेब सालके , राजू मुंगसे, अमोल साळवे , किसन बोरुडे , बाळासाहेब देंडगे,प्रविण ठूबे व भाऊ नगरे उपस्थित होते .
याप्रसंगी बोलताना संभाजी तात्या थोरात म्हणाले, अविवेकी नेत्याचे नेतृत्व बँकेला बाधक ठरते . शिक्षकांचे प्रश्न न सोडवता फक्त बँकेसाठी जन्माला आलेले नेतृत्व जास्तकाळ टिकत नसते . आता संचालकांनी विश्वासात घेऊन सभासदांना नेता मानून कारभार करा . राज्यपातळीवर शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही दिवसाची रात्र करतो .
आठ – आठ दिवस मुंबईला मुक्काम ठोकून शिक्षकांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करतो . संसार सोडून शिक्षकांसाठी झटतो . परंतु काही निष्क्रीय माणसे आमच्याविषयी राज्यात गैरसमज पसरवतात . मुख्यमंत्री ‘ शिक्षणमंत्री आम्हाला स्थान देतात ती ताकद माझी नसून राज्यातील शिक्षकांची आहे . यापुढे समन्वयला बाजूला सारून आम्हाला आमच्याच ताकदीवर प्रश्न सोडवावे लागतील .
बँकेचे अध्यक्ष सरोदे म्हणाले, संघाला अपेक्षित असा सभासदाभिमुख कारभार आम्ही करू . यापुढे बँकेत गुरुमाऊली गुरुकुलची सत्ता असेल . शिक्षकनेते राजकुमार साळवे म्हणाले, तांबेंना सत्तेचा हव्यास नडला . नेत्याला संचालकांचा भत्तासुद्धा पुरला नाही . संघात प्रवेश केलेले गुरुमाऊलीचे अध्यक्ष सुरेश निवडूंगे म्हणाले, रोहकले गुरुजींचा घात करणाऱ्याला आम्ही बँकेबाहेर काढले . संचालकांच्या परस्पर अनेक आर्थिक उद्योग होत होते ते आता बंद होतील .
या संचालकांनी केला संघात प्रवेश
बाळासाहेब सरोदे ( चेअरमन ) रमेश गोरे ( उपाध्यक्ष ) भाऊराव राहिंज , संतोष राऊत, माणिक कदम , सुर्यकांत काळे , आण्णा आभाळे, कैलास सारोक्ते , बाळासाहेब तापकीर, रामेश्वर चोपडे, शिवाजी कराड . अजून ३ संचालक लवकरच संघात प्रवेश करतील असे बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांनी सांगितले.
संभाजीतात्या थोरात म्हणाले , यापुढे समन्वयशी काम करणे बंद करावे लागेल . सरकारशी चर्चा करतात एक बाहेर सांगतात . नगर जिल्ह्यानेही आता समन्वयच्या भानगडीत न पडता संघाची ताकद वापरून शिक्षकांचे प्रश्न सोडवावेत . गर्दी आम्ही जमवायची अन भाषणे दुसऱ्याने ठोकायची हे बंद करा .