“महायुतीमधील पक्षांना जर चांगलं यश मिळवायचं असेल तर मला वाटतं महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांवर कोणतेही विधान करू नये. कारण एकमेकांच्या विरोधातील विधानांमुळे विरोधी पक्षाला टीका करायला खाद्य मिळतं. शेवटी सर्वांचं लक्ष्य एकच आहे की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणणं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना सूचना दिल्या आहेत. आता निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे कोणीही काहीही विधाने करू नये, असं त्यांनी सांगितलेलं आहे”, असं छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
अजित पवार यांच्या निवडणुकीसंदर्भातील विधानाबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “अजित पवार हे निवडणूक लढवणार आहेत. शेवटी ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत. ते अशा प्रकारे मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत. मात्र, त्यांनी मांडलेली व्यथा ही काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत जे काही झालं त्याबाबत व्यथा आहे”, असं छगन भुजबळांनी सांगितलं.