Saturday, April 26, 2025

तीन राज्यांत पराभव, महाराष्ट्रात काँग्रेस फुटीच्या चर्चा,बाळासाहेब थोरात म्हणाले…

चारपैकी तीन राज्यांत सपाटून मार खाल्ल्याने काँग्रेस नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. ‘इंडिया’ आघाडी करून विरोधी पक्षांना साथीला घेऊन भाजपला तुल्यबळ लढत देऊ, असं स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसने लोकसभेची सेमी फायनल गमावल्याने पक्षात उलट सुलट चर्चांना सुरूवात झालीये. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पराभव झाल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रातील उमटतील आणि त्याची परिणीती महाराष्ट्र काँग्रेसमधील नेते फुटण्यात होईल, अशी चर्चा निकालानंतर सुरू झाली आहे. मात्र राज्यातील काँग्रेस संदर्भातील या बातम्या धादांत खोट्या आणि खोडसाळपणाच्या आहेत. काँग्रेस एकजूट आहे, असं ठामपणे विधिमंडळ काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles