Saturday, January 18, 2025

ओबीसी वगळून सर्व नेत्यांना गावबंदी; ओबीसी समाजाकडून पहिला बॅनर लागला….

आरक्षण वादामुळे राज्यातील वातावरण दुषित होऊ लागले असून ओबीसी समाजाच्यावतीने जालन्यातील एका गावात गावबंदीचा पहिला बॅनर लावण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी राज्यभरात गावोगावी राजकीय नेत्यांना प्रवेशबंदीचे बॅनर लावण्यात आले होते. हे बंदी सर्वच नेत्यांना सरसकट घालण्यात आली होती. परंतू, ओबीसी समाजाने ओबीसी नेत्यांना परवानगी असल्याचे म्हणत इतर समाजाच्या नेत्यांना गावबंदी केली आहे.

राज्यात विधानसभा निवडणूक लागणार आहे. अशातच आता ओबीसी समाजाने नेत्यांना गाव बंदीला सुरुवात केल्याने खळबळ उडाली आहे. आजही गावागावात मराठा समाजाने नेत्यांना गावबंदी केल्याचे बॅनर झळकत आहेत. अशातच आता ओबीसी नेत्यांचेही बॅनर गावागावात लागण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाने सरसकट सर्वच नेत्यांना गावबंदी केली होती. ओबीसी समाजाने ओबीसी नेता वगळून इतर समाजाच्या नेत्यांना गावबंदी केली आहे. परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात हा बॅनर लागला आहे. ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, तसे झाल्यास मोठा अवमान करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. हाके यांनी हा निर्णय चुकीचा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles