Home राजकारण Beed सरपंच देशमुख हत्या प्रकरण….वाल्मिक कराड बाबत अखेर मंत्री धनंजय मुंडे बोलले…

Beed सरपंच देशमुख हत्या प्रकरण….वाल्मिक कराड बाबत अखेर मंत्री धनंजय मुंडे बोलले…

0
36

बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणाचा निषेध होत आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधीमंडळात या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून धनंजय मुंडे विधीमंडळात दिसले नाहीत. शुक्रवारी अखेर त्यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत घेत भूमिका स्पष्ट केली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, हत्येचं समर्थन कोणीच करु शकत नाही. त्यामुळे या प्रकरणातील सर्वच आरोपी अटक झालेले आहेत. जेवढी तीव्र भावना या प्रकरणामध्ये आमची सर्वांचीच होती. त्यात आरोपी अटक झाले आहेत. एसआयटी नेमण्यात आली आहे. सीआयडी नेमल्यानंतर अगदी शेवटपर्यंत याचा तपास होणार आहे. कोण होतं काय होतं? आदल्यादिवशी जो गुन्हेगार आहे तो आणि त्याचा भाऊ एक पोलीस अधिकाऱ्यासोबत हॉटेलमध्ये चहा पित आहेत, असा व्हिडीओ समोर आलेला आहे. तो व्हिडीओही सर्व चॅनल्सवर पाहिलेला आहे. या सर्व गोष्टी तपास यंत्रणेने काढणे गरजेचे आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, विरोधी पक्ष नेत्यांनी काय बोलावं हे मला सांगता येत नाही. पण त्यांनी हे सांगितलं असतं की, वाल्मिक कराड नेमकं नागपुरात कुठे आहे? तर तेही काम पोलिसांनी केलं असतं. त्यांनाही अटक केली असती. या आरोपींनी जशा पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या केली. त्यांना फाशी झाली पाहिजे. ही माझी स्पष्ट भूमिका आहे.