शिवसेना जर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली नसती तर 14 ते 19 पर्यंत सारखाच कारभार झाला असता आणि त्या कारभाराच्या आधारावर याहून अधिक जागा आल्या असत्या. उद्धव ठाकरे सोबत असते तर आज जेवढं बहुमत मिळाले त्यापेक्षा जास्त बहुमत मिळालं असतं”, असं वक्तव्य भाजप ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एबीपी माझीशी बोलताना केलं होतं.
एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेत मध्ये अस्वस्थता निर्माण झाली असताना दानवे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेऊन वेगळं वक्तव्य केल्याने चर्चा रंगली आहे.