दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार या भाजपच्या लोकसभा उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक झाली. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांनी धास्ती न बाळगता मतदारांमध्ये जावे, अशी सूचना केली.
बावनकुळे यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळणार आहे. केंद्र शासनाच्या कामगिरीवर आपल्याला भर द्यावा लागेल. विरोधी पक्षांकडे क्षमता राहिलेली नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक असेल. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव होईल. त्यानंतर ते कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाण्याच्या ताकदीचे राहणार नाहीत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक व्हावे, असे बावनकुळे ( म्हणाले.