शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी आपण आता विधानसभा निवडणूक लढणार आणि गद्दारांना हरवणार असं म्हटलं आहे.
“उद्धव ठाकरेंनी जर आदेश दिला तर मी विधानसभा लढवेन कारण मला गद्दारांना पाडायचं आहे. गद्दार या ठिकाणी माझ्यामुळे निवडून आले. कारण मी त्यांच्या मतदानासाठी प्रचार केला. जे फुटले त्याचं आम्हाला दुःख आहे. गद्दार सध्या नाटकं करत आहेत. आता जर गद्दारांना पाडायचं असेल तर मी नक्की निवडणूक लढवेन.” असं चंद्रकांत खैरेंनी ( ) म्हटलं आहे. “१९९० मध्ये मी आमदार झालो, १९९५ मध्ये आमदार झालो. त्यानंतर मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिल्लीत पाठवलं. दिल्लीत मी २० वर्षे होतो. यावेळी या ठिकाणी धोका झाला. जे आत्ताचे गद्दार आहेत त्यांना पैशांची मस्ती आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये हेलिकॉप्टरने पैसे आले. पोलीस आयुक्तांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. लोकसभेला पैशांचा वापर करुन मला पाडण्यात आलं. हे सगळं असलं तरीही लोक चिडले आहेत. उद्धव ठाकरेंचं वलय, शरद पवारांचं वलय आहे त्यातून ही विधानसभेची जागा आम्ही जिंकू शकतो. कन्नड, विजापूर, गंगापूर या जागाही जिंकायच्या आहेत.” असंही चंद्रकांत खैरे म्हणाले.
चंद्रकांत खैरे यांची मोठी घोषणा…विधानसभेला गद्दारांना धूळ चारण्यासाठी…
- Advertisement -