अडीच वर्षांच्या मंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांच्या मंत्रिपदाबाबत एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. अडीच वर्षांसाठी मंत्रिपद दिलं म्हणजे काहीही करावं असं नाही. सगळ्या मंत्र्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाईल, असे शिंदे यांनी म्हटले. आम्ही तिघांनी सगळ्या मंत्र्यांना सांगितलं, सगळ्यांच्या कामाचे ऑडिट होणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. आमचा प्रयत्न हे मंत्रिमंडळ सर्वप्रकारचा चेहरा दिसला पाहिजे त्यादृष्टीने जुनेजाणते आणि नव्या चेहऱ्यांना आणि सगळ्या समाजांना संधी देण्यात आली आहे. वेगवेगळी कारणं आहेत, काही मंत्र्यांना घेण्यात आले नाही, पण पक्षाने वेगळी जबाबदारी द्यायचे ठरवले आहे, काहींना कामगिरीमुळे ड्रॉप करण्यात आले, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.