यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये एनडीएची मोठी पीछेहाट झाली असून इंडिया आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे. समाजवादी पक्षानं भारतीय जनता पक्षाच्या जागा जिंकून भाजपाला मोठा धक्का दिला आहे. उत्तर प्रदेशातील एकूण जागांपैकी सर्वाधिक चर्चेतील दोन जागा म्हणजे अमेठी आणि रायबरेली. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसच्या उमेवारांनी बाजी मारली आहे. रायबरेलीत खुद्द राहुल गांधी निवडून आले असून अमेठीतून काँग्रेस नेते किशोरी लाल शर्मा यांनी भाजपाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना आस्मान दाखवलं. या निकालानंतर किशोरी लाल शर्मा यांच्या मुलींनी स्मृती इराणींना खोचक शब्दांत सुनावलं आहे.
दरम्यान, किशोरी लाल शर्मा यांच्या विजयावर त्यांच्या मुलींनी खोचक शब्दांत स्मृती इराणींना टोला लगावला आहे. तसेच, त्यांच्या वडिलांवर स्मृती इराणींनी केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला आहे. “तुम्ही आमच्या वडिलांना नोकर बोला, शिपाई बोला, प्रॉक्सी उमेदवार बोला, मुंगी बोला, काहीही बोला.. आम्हाला काही फरक पडत नाही. जे काही आहे ते सगळं आकडेच तुम्हाला सांगत आहेत. तुम्ही निकाल पाहिला आहे”, असं त्यांच्या धाकटी लेक अंजली शर्मा हिनं म्हटलं आहे.
https://x.com/shaandelhite/status/1798422722051252313?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1798422722051252313%7Ctwgr%5Ee24a5849715ea707284e5670ab5073aebd28fc3c%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Felections%2Fcongress-kishori-lal-defeats-smriti-irani-in-amethi-loksabha-election-results-pmw-88-4413352%2F