Saturday, May 4, 2024

नगर जिल्ह्यात काँग्रेस अस्तित्वहीन,महिलांच्या अस्तित्वासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार

अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस अस्तित्वहीन, महिलांच्या अस्तित्वासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार – मंगल भुजबळ
अहमदनगर :सप्टेंबर 2023 मध्ये दिल्ली येथील संसदीय अधिवेशनात लोकसभा व राज्यसभेत महिलांना 33% आरक्षण देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर असतानाही अहमदनगर दक्षिण लोकसभेला एकाही राजकीय पक्ष्यानं महिलांना उमेदवारी दिलेली नसल्याने महिला आरक्षणाला एकप्रकारे सर्वच राजकीय पक्ष्यानी तिलांजली दिली आहे असे निदर्शनास येत आहे त्यामुळे महिलांच्या अस्तित्वासाठी व महिला आरक्षणाच्या अस्मितेसाठी आपण लोकसभा उमेदवारी अर्ज घेतला असून 25 तारखेला अर्ज सादर करणार असल्याचे काँग्रेसच्या राष्ट्रीय ओबीसी समन्वयक मंगल भुजबळ यांनी म्हटले आहे.जातीनिहाय जनगणना केंद्र सरकारने करावी व सर्व जातीधर्मांना न्याय मिळवून द्यावा तसेच शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना न्याय मिळावा व इतरही प्रमुख प्रश्न घेऊन आपण ही निवडणूक लढविण्याचे ठरविले असून आपला लढा हा फक्त आणि फक्त जनतेच्या हितासाठी असल्याने व आपण सातत्याने निवडणूक असो अथवा नसो जनतेच्या संपर्कात असल्याने ही निवडणूक लढविण्यासाठी आपण रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.. मध्यंतरी माध्यमातून समजले की राहुलजी गांधी साहेब महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी येणार आहेत परंतु माझ्या माहितीनुसार माननीय राहुलजी गांधी साहेब यांचा अहमदनगरचा असा कोणताही दौरा आखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे आलेला नसल्याने ते येणार नाहीत हे निश्चित आहे कारण अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस अस्तित्वहीन होत असताना व एकही लोकसभेची जागा काँग्रेसला मिळाली नसताना ते येणारचं नाहीत याची आम्हाला खात्री आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles