Wednesday, June 25, 2025

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य ; राजीनामा देणार पटोले म्हणाले….

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावात जावून गावकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी गावकऱ्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याचं मोठं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार असाल तर आपण राजीनामा देवून पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं नाना पटोले म्हणाले. “मारकडवाडीतील ग्रामस्थांना सलाम करायला इथे आलोय. पाकिस्तान, श्रीलंका या देशातील लोकशाही संपुष्टात येत आहे. आमच्या देशात पण EVM द्वारे आमचे मत चोरून चालले आहे. निवडणुका झाल्या की आयोग पत्रकार परिषद घेतो. मात्र यावेळी पत्रकार परिषद घेतली नाही. आम्ही त्यावर आक्षेप घेतल्यावर त्यांनी तोडकीमोडकी उत्तरं दिली. त्यांनी रात्री 11 पर्यंत मतदान झाले, असे सांगितले मग त्याबाबत आम्ही व्हिडीओ मागितले. ते देखील आयोगाने दिले नाहीत”, असं नाना पटोले म्हणाले.

“चोर के दाढी में तीनका अशी म्हण आहे. अर्थात मी मोदींच्या दाढीबाबत बोलत नाही. हा आवाज जनतेने उचलला आहे. राजकीय नेत्यांनी उचलला नाही. आज काही लोक गावात येऊन काही बोलले. हे पेशवाईतील लोक आहेत. त्यावर अधिवेशनात बोलतो. मारकडवाडीवर विधानसभेत चर्चा घ्या, अशी मागणी केली. मात्र त्यावर ते बोलले नाहीत कारण त्यांना तुमच्यावर राग आहे”, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

“एका आमदाराला अजून विश्वास नाही कारण ते म्हणतात मलाच माहिती नाही मी कसा निवडून आलो. 2014 पर्यंत या देशावर 55 लाख कोटींचे कर्ज होते, ते आता 220 लाख कोटींचे झाले. पूर्वी शेतकरी, कष्टकरी यांच्याकडून कर घेतला जात नव्हता. पण आता हे शेतकरी, कष्टकरी यांच्याकडून कर वसुल करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धोरणे काँग्रेसने स्वीकारली आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे कायम समर्थन केले”, असं नाना पटोले म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles