जिल्ह्यात गुरूवारी रात्रीपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरूवात झाली आहे. यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असल्याने खरीप हंगामातील तूर, मका, चारा पिके, तर उशीराच्या सोयाबीन, कपाशी पिकाला जीवदार ठरला आहे. यासह रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण तयार होत असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास शेतकर्यांसह नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मागील लागणार आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे दक्षिण जिल्ह्यातील शेतीसाठी वरदार असणार्या विविध धरणांच्या पाणी पातळीत वाढ होतांना दिसत आहे.
राज्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांहून अधिक काळ रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या दोन दिवसांंपासून राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार, तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस मेघ गर्जना, विजांच्या कडकडाटासह पडत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग मुंबई यांच्याकडून राज्यात बहुतांशी भागात मुसळधार पावसाची शक्यत व्यक्त केली असून नगर जिल्ह्यात 27 तारखेपर्यंत यलो अर्लट जारी करण्यात आल्या आहेत.
अहमदनगर सह राज्यात चार दिवस यलो अर्लट , अनेक भागात मुसळधार
- Advertisement -