राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या आहे. आता राजकीय पक्षांसोबत सगळ्यांना विधानसभेच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. त्या दृष्टीने नेत्यांनी तयारी देखील सुरु केली आहे. एकीकडे नेत्यांची तयारी सुरु असतानाच आता केंद्रीय निवडणुक आयोगाने महाराष्ट्रासह इतर ३ राज्यांच्या विधानसभांबाबत महत्वाची अधिसुचना जाहीर केली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभेची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग कामाला लागले आहे. यासाठी आज मतदारांच्या याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणुक आयोगाने सर्व सामान्य नागरीकांना आवाहन देखील केले आहे. त्यांनी असे म्हंटले की ज्यांनी अद्यापपर्यंत मतदार नोंदणी केली नसेल त्यांनी तातडीने मतदार नोंदणी करुन घ्यावे असे आवाहन केले आहे. यासोबतच, घरोघरी जाऊन मतदार याद्या अद्ययावत करा, अशा सुचना देखील आयोगाने दिल्या आहे.
२५ जूनपासून म्हणजेच येत्या चार दिवसांपासून महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर या ठिकाणी निवडणुकीच्या आधीची तयारी सुरु होणार आहे. पोलींग स्टेशन्स, मतदारांचे समूह यांची चाचपणी केली जाणार आहे. असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच निवडणूक आयोगाने महत्त्वाची बाब नमूद केली आहे.
हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ ला संपणार आहे. त्यादृष्टीने आता राज्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत.
https://x.com/ANI/status/1804040142547751022?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1804040142547751022%7Ctwgr%5E5a536c1e3db65f7f8630e9d8ace26cef336e05f8%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fdeshdoot.com%2Felection-commission-started-updation-of-assembly-elections-of-maharashtra-with-other-3-states%2F