Tuesday, December 5, 2023

२०११ विश्वचषकात फायनल मध्ये धोनी नव्हे ‘हा’ खेळाडू होता सामनावीर पुरस्काराचा हक्कदार

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर हा त्याच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिद्ध आहे. 2011 वर्ल्ड कप फायनलबद्दल गौतम गंभीरने पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे. भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या या सामन्यात एमएस धोनीने नाबाद 91 रनची खेळी केली होती, ज्यामुळे भारताने 275 रनचं आव्हान यशस्वी पार केलं, त्यामुळे धोनीला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. गंभीरने मात्र मॅन ऑफ द मॅचवर दुसऱ्याच खेळाडूचा अधिकार होता, असं गंभीर म्हणाला आहे.
2011 वर्ल्ड कप फायनलमध्ये गंभीरने 97 रनची महत्त्वाची खेळी केली होती, पण झहीर खान मॅन ऑफ द मॅचसाठी खरा लायक होता, असं वक्तव्य गौतम गंभीरने केलं आहे.

2011 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये झहीर खानने 10 ओव्हरमध्ये 60 रन देऊन 2 विकेट घेतल्या होत्या. झहीर खानने फायनलच्या पहिल्या तीनही ओव्हर मेडन टाकल्या होत्या, यानंतर मॅचच्या 7व्या ओव्हरमध्ये त्याने उपुल थरंगाची विकेट घेतली होती. पहिल्या 5 ओव्हरच्या स्पेलमध्ये झहीरने फक्त 6 रन दिल्या होत्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: