Friday, March 28, 2025

ज्यांनी त्रास दिला त्यांचा शेवट मराठेच करणार.. मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा… उपोषण स्थगित

जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मागच्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले होते. आज त्यांनी उपोषण स्थगित केलं असल्याची घोषणा केली आहे.देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगतो की मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला कुणबी मराठा एकच आहे. समाज एक झाला हे चांगलं झालं आहे. मराठा आणि ओबीसी एकच आहेत. आपल्या आरक्षणाची लढाई पुढे चालली आहे. आपण कुठल्याही नेत्याला भ्यायचं नाही हे लक्षात घ्या. आमच्या लेकरांशी, लेकींशी बेइमानी करु नका. तसंच तुम्हाला सांगतो एकाही नेत्याच्या सभेला, प्रचाराला जायचं नाही, असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

ज्यांनी त्रास दिला त्यांचा शेवट मराठेच करणार
खुशाल घरी झोपून राहायचं, लाडकी बहीण योजनेचे पैसे नाही दिले तरी चालतील कुणीही प्रचाराला जायचं नाही. राजकीय नेत्यांनी दबाव आणला तर एकमेकांना साथ द्या. त्यापेक्षा जास्त त्रास दिला तर व्यासपीठावर गर्दी आणि मतदानाला कुणीच नाही हे लोकसभेला झालं आहे तसंच आत्ताही करा असंही मनोज जरांगे म्हणाले. मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित झाल्याची घोषणा करताच एक मराठा लाख मराठाच्या घोषणा करण्यात आल्या. मराठा आरक्षणासाठीची जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. मराठा समाजाने मला खूप आग्रह केला. त्यांनी उपोषण करायचं नाही असं सांगितलं. ज्यांनी ज्यांनी मराठ्यांना त्रास दिला त्यांचा शेवट मराठेच करणार आहेत. मी आज ४ किंवा ५ वाजता उपोषण सोडणार असल्याचं मनोज जरांगेंनी जाहीर केलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles