‘कौन बनेगा करोडपती’चा 15वा सीझन संपला आहे. या सीझनचा शेवटचा एपिसोड 29 डिसेंबर रोजी प्रसारित करण्यात आला. यावेळी अमिताभ बच्चन हे भावून झाल्याचं पाहायला मिळालं. शर्मिला टागोर, सारा अली खान आणि विद्या बालन ‘KBC 15’ च्या शेवटच्या एपिसोडमध्ये दिसल्या होत्या. शर्मिला टागोर आणि विद्या बालन यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या अनेक सुंदर आठवणी या निमित्ताने शेअर केल्या. पण जेव्हा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
कौन बनेगा करोडपती 15 ची सुरुवात 18 एप्रिल 2023 रोजी मोठ्या धूमधडाक्यात झाली. हा सीजन एक दिवस संपणार याची जाणीव अमिताभ यांना होती पण स्पर्धक आणि प्रेक्षकांच्या आनंदासमोर त्यांनाही या गोष्टीचा विसर पडला. ही गोष्ट त्यांनी मान्य देखील केली.अमिताभ ‘केबीसी’मधील प्रत्येक स्पर्धकासोबत मजा करताना आणि त्यांच्या आयुष्यातील आणि करिअरमधील मजेशीर किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करताना दिसले.त्यांनी या सीजनदरम्यान खळखळून हसवलं. पण जेव्हा ‘कौन बनेगा करोडपती 15’ला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा त्यांचा भावना दाटून आल्या आणि त्यांना अश्रू अनावर
KBC Finale mein Amitji bayaan karte hain apne dil ki baat. Hasi, prem, aur yaadon se bhare iss anokhe safar ko yaad kiya jayega!
Dekhiye #KaunBanegaCrorepati Grand Finale,
aaj raat 9 baje, sirf #SonyEntertainmentTelevision par.#KBC15 #KaunBanegaCrorepati #KBCOnSonyTV… pic.twitter.com/slYNqDFuLJ— sonytv (@SonyTV) December 29, 2023