लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात मतदान पार पडले. मुंबई, ठाणे, कल्याणसह राज्यातील १३ लोकसभा मतदार संघांमध्ये मतदान झाले. या मतदानादरम्यान मुंबईमध्ये अनेक ठिकाणी यंत्रणांनी संथगतीने मतदान केल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला होता, तसेच अनेक नागरिकांनी तक्रारीही दिल्या होत्या. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यातील पाचव्या टप्यात मतादानाची टक्केवारी घटली, त्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता क? याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान प्रक्रियेदरम्यान आलेल्या अनेक तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे.
मतदानावेळी वृद्ध मतदारांना रांगेचा आणि कडक उन्हाचा मतदारांना झालेला त्रास त्यामुळे मतदानावर झालेला परीणाम यांची सविस्तर चौकशीचे करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना आदेश दिलेत. पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रियेची प्रशासनाने पुरेसी काळजी घेतली नव्हती का? मतदान टक्केवारी कमी का झाली? प्रशासन कुठे कमी पडले? याची तात्काळ चौकशी करण्यासंदर्भातील सूचना मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या आहेत.