पुणे : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गोड बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आज मंगळवारी या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे.
बारावीच्या परीक्षेत एकूण ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. बारावीचा निकाल विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने दुपारी १ वाजता पाहू शकतात.
महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत या निकालाची माहिती दिली. बारावीची परीक्षा ही २१ फेब्रुवारी २३ मार्च २०२४ दरम्यान घेण्यात आली होती. आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल जाहीर केला. यंदा राज्याचा बारावीचा ९३.३७ टक्के लागला.बारावीची एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी या परीक्षेत एकूण 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या वर्षी देखील मुलींनी बाजी मारल्याचं दिसून आलं.
बारावीच्या परीक्षेत एकूण ९५.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदा एकूण ९१.६० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.१२ टक्क्यांनी वाढ झाली. राज्यात यंदा कोकण विभागातील ९७.५१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागाचा ९१.९५ टक्के इतका सर्वात कमी निकाल लागला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
या अधिकृत वेबसाईटवर पाहा निकाल –
– maharesult.nic.in
– mahahsscboard.in
– hsc.maharesults.org.in
– hscresult.mkcl.org
– results.gov.in.
P158817
12HSC Result