भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असे तीन पक्षाचे सरकार सत्तेत असल्यामुळे अंतर्गत वादविवाद होऊ नये, तसेच या तिनही पक्षांमध्ये समन्वय राहण्यासाठी या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील प्रत्येकी चार सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
समितीत समन्वय साधण्याचे काम भाजपाचे नेते प्रसाद लाड करणार आहेत. भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड आणि आशिष शेलार यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.
शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, राहुल शेवाळे यांचा या समितीत सहभाग असणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) समितीवर सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांचा समावेश करण्यात आला आहे.






