सगे सोयऱ्यांचाही कुणबीत समावेशाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंनी सरकारला 13 जुलैची मुदत दिलीय. ही मुदत संपत आली असतानाच मनोज जरांगे पाटलांनी 6 जुलैपासून राज्याच्या दौऱ्याचं रणशिंग फुंकून सरकारला इशारा दिलाय. या पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांचा समावेश आहे.
जरांगेंच्या दौऱ्याचा रोडमॅप
6 जुलै- हिंगोली
7 जुलै- परभणी
8 जुलै- नांदेड
9 जुलै- लातूर
10 जुलै- धाराशिव
11 जुलै- बीड
12 जुलै- जालना
13 जुलै- छत्रपती संभाजीनगर
सरकारने शब्द पाळला नाही तर 288 जागा लढणार की पाडणार? यासंदर्भात निर्णय घेण्याचा इशाराही दिलाय. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झालीय. त्यातच जरांगेंनी पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत केलंय. तर जरांगे हिंगोलीपासून शांतता रॅलीला सुरुवात करणार आहेत. त्यामुळे लोकांनी आपली कामं सोडून मराठा आरक्षणासाठी एकत्र येण्याचं आवाहनही जरांगेंनी केलंय.