मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी ४ जून रोजी उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणाची तारीख बदलली आहे. निवडणुकीचा निकाल पाहता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता हा निर्णय घेतला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं असताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ४ जून रोजी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. पण मनोज जरांगे पाटील यांच्या गावामधून म्हणजे अंतरवाली सराटी येथील काही ग्रामस्थांनी उपोषण आंदोलनाला विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या आंदोलनामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण तात्पुरत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.