Monday, June 23, 2025

मतदान संपताच मराठे वाईट झाले काय? पुढच्या निवडणुकीत नाव घेऊन पाडू…

बीड लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये जातीचं राजकारण झाल्याचा आरोप होत आहे. तसेच दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचाही आरोप होतो आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. बीड जिल्हा संतांची भूमी आहे. आमच्या महाराष्ट्रात आणि बीड जिल्ह्यात असं कधी झालं नाही. आम्ही कधीच म्हणणार नाही की एखाद्या समाजाच्या दुकानात जाऊ नका. असे विचार आम्ही ठेवणार नाहीत. जातीय तेढ निर्माण व्हायला काय झालं? १३ तारखेपर्यंत मतदान होईपर्यंत मराठे चांगले होते. १३ तारीख संपली की मराठे वाईट झाले.

आम्ही शांत आहोत, आम्हाला शांत राहूद्या. जातीय तेढ निर्माण होऊ नये, असं आवाहन बीड जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांना करतो. त्यांच काम होईपर्यंत ते सगळ्यांच्या पाया पडले. मात्र, शेवटी एक पर्याय आहे. अन्याय बंद करायचा असेल आपल्याला सत्तेत जावं लागणार आहे”, असं मोठं विधान मनोज जरांगे यांनी केलं.

ज्यांनी मराठा समाजावर अन्याय केला, त्यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही, पण नाव घेऊन त्यांना पाडल्याशिवाय सोडायचं नाही”, असं म्हणत ४ जूनच्या उपोषणावर आपण शंभर टक्के ठाम आहोत. माझ्या समाजाच्या न्यायाचा विषय असून राज्य सरकारने आम्हाला दिलेल्या शब्दाला आज पाच महिने होऊन गेले आहेत. मग राज्य सरकारला अजून किती दिवस पाहिजेत?”,असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles