संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल!
ओबीसी विरुद्ध मराठा या मुद्द्यावर मंत्रालयात गँगवॉर चालू आहे. मला वाटतंय या वादात एखादा मंत्री यात मारही खाईल. आम्हाला कळतंय की हे मंत्री एकमेकांवर धावून जात आहेत. आणि यावर मुख्यमंत्र्यांचं कोणतंच नियंत्रण नाहीये. छगन भुजबळ, शंभूराज देसाई यांच्यात विसंवाद आहे. या राज्यात अशी स्थिती कधीच दिसली नाही – संजय राऊत
२४ डिसेंबरनंतर महाराष्ट्रात काय होईल हे सांगता येत नाही. जरांगे पाटलांनी २४ डिसेंबरची मुदत सरकारला दिली आहे. मुंबईचं नाक बंद करू, हा जरांगे पाटलांनी दिलेला इशारा मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतला नाही तर देशात महाराष्ट्राची बेअब्रू होईल – संजय राऊत