काँग्रेसच्या प्रमुखांकडून अजून जागावाटपाचा कोणताही प्रस्ताव नाही, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे. तर राष्ट्रवादीशी जागावाटपाचं जवळपास निश्चित, तर वंचितबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
“माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका 30 एप्रिलच्या आत करतील. त्यांना कोणीतरी सांगितलं आहे की, 30 एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला तरच तुमचं काहीतरी होईल, असं माझ्या कानावर आलं आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी सुरळीत झालेली आहेत, ज्यावेळी इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक पार पडली, त्यावेळी काँग्रेससोबतही बोलणं झालं. त्यावेळी माझ्यासोबत संजय राऊत होते. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशीही याबाबत सविस्तर बोलणं झालं. त्यामुळे सर्वकाही सुरळीत होणार आहे. इथे जे काही बोललं जात आहे, त्यावर विश्वास ठेवू नका, कारण असा कोणताही निरोप मला त्यांच्याकडून आलेला नाही.”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.