धाराशिव : ग्रामपंचायतीच्या १३ सदस्यांनी सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. या ठरावावरील मतदानासाठी आयोजित केलेल्या बैठकीला अविश्वास ठराव दाखल करणारे तेराही सदस्य अनुपस्थित राहिल्यामुळे सरपंचपद वाचले. सरपंचपद वाचल्याचा आनंद सरपंचांनी स्वत:ची उंटावरून मिरवणूक काढून साजरा केला. ही अनोखी मिरवणूक पाहण्यासाठी अख्खा गाव जमा झाला होता.
ही घटना आहे धाराशीव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील ईट या गावातील. ईट हे गाव तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. या गावची ग्रामपंचायतदेखील मोठी आहे. तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून या गावाची ओळख आहे. संजय असलकर यांची सरपंचपदी निवड झाली. मात्र, ते मनमानी कारभार करतात असा आरोप करून १४ पैकी १३ सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. या ठरावावर मतदान घेण्यासाठी १३ डिसेंबर रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच संजय असलकर आणि त्यांच्या सोबतचा एक सदस्य असे दोघेच या बैठकीला उपस्थित होते. ज्या तेरा जणांनी अविश्वास ठराव दाखल केला होता, ते या बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे असलकर यांचे सरपंचपद कायम राहिल्याने अविश्वास ठराव फेटाळला गेला. त्यामुळे असलकर १३ डिसेंबर रोजी ते पुन्हा सरपंचपदी निवडून आहे. तहसीलदार सचिन खाडे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
त्यानंतर १५ डिसेंबर रोजी संजय असलकर आणि त्यांच्या सोबत असलेले ग्रामपंचायत सदस्य सयाजी हुंबे यांची उंटावरून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या वेळी फटाक्यांची आतषबाजीदेखील करण्यात आली. ही आगळीवेगळी मिरवणूक पाहण्यासाठी अख्खा गाव जमा झाला