नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील तीखी ग्रामपंचायत तीचे ग्रामसेवक धोबे तात्यासाहेब अप्पासाहेब यांनी विविध योजनेत मोठी अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला असून थेट ग्रामविकास विभागाकडे केलेल्या तक्रारी नंतर अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.) यांनी कर्जत गट विकास अधिकाऱ्यांना संबंधित तक्रारीची चौकशी करून अफरातफरी बाबत उचित कारवाई करत जिल्हा परिषदेला अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे.
या बाबत स्थानिक नागरिक नामदेव दळवी यांनी याबाबत तक्रार केली होती. तक्रारीत तीखी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक धोबे तात्यासाहेब अप्पासाहेब यांनी, गावात ग्रामपंचायत कार्यालयात वेळोवेळी हजर न राहने, फोन केल्यास उडाउवी ची उत्तरे देणे, १५. वां वित्त आयोगातील कामाची परस्पर बिल काढणे, उदा सार्वजनिक कचरा कुंजा खरेदी न करताच पैसे काढणे, गावाअंतर्गत पाइपलाइन न करता पैसे काढणे, अंगणवाडी साहित्य घोटाळा, जिल्हा परिषद शाळा फिल्टर संगणक खरेदी, पंतप्रधान आवस योजपणे अंतर्गत येणाऱ्या योजनेचा गरजू व्यक्तींना लाभ न देता नातेवाईक आणि गावातील इतर लोकाकडून १५ हजार रुपये घेऊन संबंधित व्यक्तींना लाभ देणे, गावातील लोकांना जन्मदाखले, जागेचे उतारे देण्यास टाळाटाळ,घरकुल योजनेतील गरजू लाभायाँना प्राधान्य कम चुकवणे, ग्रामपंचायत सदस्य यांना बैंक खात्याचा तपशील आणि इतर महत्वाचे दप्तराखण्यास टाळाटाळ करणे . ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेणे. या प्रकारच्या गंभीर तक्रारी करत शासनाच्या संबंधित विभागाकडे ऑनलाईन तक्रार केली होती.
याबाबत ग्रामविकास विभागाने गांभीर्याने दखल घेत अहमदनगर जिल्हा परिषदेला संबंधित तक्रार अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अहमदनगर जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गट विकास अधिकारी यांना या प्रकरणी चौकशी आणि चौकशीत तथ्य असल्यास उचित कारवाईचे आदेश देत याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे.