पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जून रोजी सत्ता हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीला भेट देणार आहेत. यादरम्यान, ते देशभरातील ९.२६ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा PM-KISAN योजनेचा १७वा हप्ता जारी करणार आहेत. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकारांशी बोलताना कृषी क्षेत्राप्रती सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. चौहान म्हणाले, “पंतप्रधान मोदींचे गेल्या दोन कार्यकाळात शेतीला नेहमीच प्राधान्य राहिले आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदीजींनी सर्वप्रथम पीएम-किसान योजनेचा १७वा हप्ता जाहीर केला आणि त्यांनी त्या संबंधित फाइलवर सही देखील केली.”