येत्या २०२४- २५ च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पनात शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी २०२४ च्या अर्थसंकल्पात नमो शेतकरीचा हप्ता वाढवू शकते.
सध्या या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवून ८ हजारांचा हप्ता दिला जाऊ शकतो. वर्षभरात सन्मान निधी योजना ही तीन हप्त्यांमध्ये दिला जातो. दर चार महिन्यांनी २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातील. मोदी सरकारच्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात या सन्मान निधीचा १५ वा हप्ता जमा केला होता.
केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी योजना आहे. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू करण्यात आली. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीत वाढ केली जावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.
२०२४ मध्ये लोकसभा निवडणुका असतील. त्यामुळे मोदी सरकार सर्वसामान्यांसाठी आर्थिक संकल्पनात बदल करतील अशी आशा ही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या वर्षीचा आर्थिक बजेटमधून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
1. या योजनेचा पात्रता काय?
महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच या योजनेसाठी पात्रत आहेत.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करावा लागेल.
शेतकऱ्याकडे यासाठी स्वत:ची शेतजमीन असणे देखील आवश्यक आहे.
अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.