आगामी लोकसभेपूर्वी शहापूरमध्ये ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचा मुक्त संवाद दौरा सुरु आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर तोफ डागली. कपिल पाटील यांची शहापुरात सभा असल्याने गर्दी जमणार नाही म्हणून ते गौतमी पाटील यांना खास गर्दी जमवण्यासाठी घेऊन येत आहेत. जर गौतमी पाटीलमुळे लोक जमत असतील तर त्यांनी निवडणुकीचं तिकीट गौतमी पाटील हिलाच द्यावं, असा खोचक टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.