Wednesday, May 14, 2025

पक्ष नेतृत्वाचा विश्वास असल्याने उउमेदवारीची चिंता नाही,आ. मोनिका राजळे

दोन महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह पक्षनेतृत्वाचा आपल्यावर विश्वास आहे. त्यामुळे उमेदवारीची चिंता करू नका. विधानसभा निवडणुकीत स्वतः उमेदवार समजून भाजप महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन आ. मोनिका राजळे यांनी केले. तोंडोळी येथील श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे श्रावणनिमित्त राजळे कुटुंबियाच्या वतीने 30 वर्षापासुन दरवर्षी महापूजा व अभिषेक करून स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही राहुल राजळे यांनी महापुजा करून अभिषेक केला. त्यानंतर मेळाव्यात आ. राजळे बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी हभप गणपत महाराज होते तर भाजप तालुकाध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, शहराध्यक्ष बंडू बोरुडे, रामकिस काकडे, काकासाहेब सातपुते, विष्णुपंत अकोलकर, भगवान आव्हाड, धनंजय बडे, संदिप पठाडे, चारुदत्त वाघ, नारायण पालवे, मुकुंद गर्जे, संजय किर्तने, महेश बोरुडे, वैभव आंधळे, भगवान साठे, शुभम गाडे, सचिन वायकर, मंगल कोकाटे, ज्योती शर्मा उपस्थित होते. आ. राजळे म्हणाल्या, दहा वर्षापासून केंद्रात व राज्यात भाजप महायुती सरकारच्या माध्यमातून निधी आणुन विकासाच्या माध्यामातून मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलविण्याचा प्रयत्न केला. पक्षाशी प्रामाणिक राहत सर्व उपक्रम राबविले. जातीपातीचे राजकारणा केले नाही.

मनामध्ये राग कधी धरला नाही, प्रत्येकाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्यांचे समाधान झाले नाही, त्यांचेही आगामी काळात नक्कीच समाधान करू. विरोधकांकडे ठोस मुद्दाच नसल्याने ते खोटे अरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. परंतु जनता सुज्ञ आहेत. प्रास्तविक बाजार समितीचे संचालक अजय रक्ताटे यांनी तर आभार सभापती संदिप पठाडे यांनी मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles