Tuesday, January 21, 2025

शिर्डी विधानसभा मतदारंसघावर भाजपच्या डॉ.राजेंद्र पिपाडांचा दावा, विखेंवर जनतेत नाराजी असल्याची भूमिका

नगर (प्रतिनिधी)- शिर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार विखे यांच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी व रोष असल्याने ते निवडून येणार नाही असे जनतेचे ठाम मत आहे त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवावी असा लोकांकडून आग्रह आहे जनतेच्या इच्छेला प्रतिसाद देत शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे उमेदवार बदलला तर जागा वाचेल त्यामुळे मी या विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहे वर्षानुवर्ष सर्व तक्ता केंद्रे एकच कुटुंबात असल्याने जनतेमध्ये नाराजी आहे यापूर्वी आपण विधानसभा निवडणुकीत कडवी झुंज देऊन 11 फेऱ्यामध्ये तेरा हजार मतांनी पुढे होतो विजयाच्या जवळ पोहोचलो होतो त्यानंतरच्या निवडणुकीत मी वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रशस्तीत पाळली हे लक्षात घेऊन आपणास येथून उमेदवारी मिळावी अशी मागणी वरिष्ठ नेत्यांना भेटून करणार आहे अशी माहिती भाजप नेते डॉ.राजेंद्र पिपाडां यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुढे डॉ राजेंद्र पिपाडा पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, शिर्डी विधानसभा मतदारसंघात विरोधकांना खालच्या पातळीवर जाऊन त्रास दिला जातो जो विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असतो त्याच्या विरोधात आपल्या बगलबच्च्यांना पत्रके काढायला लावली जातात विरोधात उभा राहिलेला उमेदवार मॅनेज आहे अशी चर्चा करून बदनामी केली जाते सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की राजेंद्र पिपाडा कधीही मॅनेज झाले नाही आणि होणार नाही विरोधाकांवर ॲट्रॉसिटी व विनयभंगासारखे खोटे गुन्हे दाखल केले जातात मी न पाहिलेल्या जिल्ह्याबाहेरील माणसाने माझ्यावर ॲट्रॉसिटीचा खोडा गुन्हा दाखल केला होता आमच्यावर जीव घेणे हल्लेही झालेले आहे मात्र आपण या दडपशाहीस पुरून उरलो आहे विरोधकांवर हल्ले केले जातात काही वर तर हल्ले घडून त्याचे हात पाय मोडण्याच्या घटना यावर्षीच घडले आहे दहशत आणि दडपशाही सुरू आहे विरोधकांची अडवणूक करणाऱ्यांचे आणि जिरवा जिरवीचे राजकारण करण्यात धन्यता मानली जात आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात विकासाचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे गुन्हेगारांनी छान मांडला आहे ही परिस्थिती आपण बदलू शकतो हे राहता पालिकेच्या माध्यमातून आपण दाखवून दिले मोडकलीला आलेले गोदावरी कालवे खड्ड्यात गेले शिर्डी नगर रस्ता आणि 55 वर्ष होऊनही नीलवंडे कालव्याचे पाणी अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात गेले नाही या महत्त्वाच्या समस्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्या पूर्ण करण्याची इच्छाशक्ती दाखवली जात नाही साई संस्थांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणारे प्रकल्प राबवले जात नाही रोजगाराची साधने नसल्याने युवक बेरोजगार आहे शेतीला पाणी नसल्याने सामान्य शेतकरी आणि विकास ठप्प झाल्याने जनता भरडली जात आहे आपण स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न व संवेदना आपल्याला समजतात. साई संस्थांच्या 598 कामगारांचा प्रश्नासाठी गेलेल्या दोन वर्षापासून आम्ही प्रयत्न करीत असून हा प्रश्न लवकरच सुटेल अशी अशा आहे व साई संस्थांच्या वतीने अद्यावत कॅन्सर उपचार रुग्णालय तसेच बर्निंग वाढ सुरू व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत साई संस्थांच्या वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेज झाले पाहिजे यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles