पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात ७१ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये केरळमधील भाजपाचे एकमेव खासदार सुरेश गोपी यांचाही समावेश आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लागलीच अनेक चर्चा रंगू लागल्या. अनेक वृत्त माध्यमांवर त्यांना मंत्रिपद नको असल्याचं प्रसिद्ध झालं. परंतु, या वृत्तांनंतर त्यांनी आता खुलासा केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे.
“मी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देणार असल्याची चुकीची बातमी काही मीडिया प्लॅटफॉर्म पसरली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केरळच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी कटिबद्ध आहोत”, असं सुरेश गोपी म्हणाले.