आ.निलेश लंके म्हणाले भाजपा सरकार सत्तेचा गैरवापर सुरू केला, सरपंच निवडणुकीतही…..

0
63

आमचे सरकार होते तेव्हा कधीच आम्ही सत्तेचा गैरवापर केला नाही, मात्र भाजपचे सरकार आले आणि त्यांनी सत्तेचा गैरवापर सुरू केला. चिचोंडी पाटिल गावच्या सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक जाणीवपूर्वक लांबविण्याचे कारस्थान केले गेले, पण काळजी करू नका येत्या दीड महिन्यात आपलेच पुन्हा सरकार येण्याची शक्यता आहे असे भाकीत आमदार निलेश लंके यांनी एका कार्यक्रमात केली.

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावच्या सरपंच उपसरपंच पदाचा पदभार आमदार लंके यांच्या उपस्थितीत झाला. सरपंच शरद पवार व उपसरपंच जयश्री कोकाटे यांनी पदाचा पदभार घेतला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाधयक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार साहेबराव दरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी लंके म्हणाले की आमच्याकडे सत्ता असताना मी कधीच कोणाचा राग राग केला नाही. प्रत्येक गावात मोठा निधी दिला हे गाव माझ्या मतदारसंघात नसताना सुद्धा 20 लाख दिले .आता गावात आमची सत्ता आली आहे पण राज्यात नाही ती पण दीड महिन्यात पुन्हा येणार आहे असे भाकीत लंके यांनी केले.