नगर जिल्हयात स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्यात येणार ; मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर

0
26

जिल्हयात स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्यात येणार
ग्रामपंचायत स्तरावर कुटुंबांचा होणार सन्मान

अहिल्यानगर: प्रतिनिधी

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत स्वच्छ माझे अंगण अभियान दि. १ ते २० जानेवारी या कालावधीत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे, असे आवाहन आशिष येरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद यांनी केले आले आहे.

प्रत्येक कुटुंबाने स्वच्छतेचे उच्चतम मानक राखत ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनवणे, वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर आणि दैनंदिन स्वच्छतेचे पालन, घरगुती कचऱ्याचे
वर्गीकरण व पुनर्वापर, कंपोस्ट खत तयार करणे, परसबाग व सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा व पाझरखड्डयांचा वापर करणे हे या अभियानाचे उद्दिष्टे आहेत. या अभियानात
स्वच्छतेचे आदर्श उदाहरण ठरलेल्या कुटुंबांचा २६ जानेवारी रोजी ग्रामसभेत प्रशस्तीपत्र
श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल. ग्रामीण भागात स्वच्छतेचा आदर्श
निर्माण करून इतरांना प्रेरित करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने या अभियानात सहभागी व्हावे. घरातील कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व शौचालयांच्या स्वच्छतेवावत नियमांचे पालन करावे. यासाठी गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी.
महिला बचत गट व ग्रामस्थांनी या अभियनात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन दादाभाऊ गुंजाळ प्रकल्प संचालक जल जीवन मिशन यांनी केले