राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत असेल तर रश्मीताई देखील सज्ज आहेत आणि त्यांचा राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास आहे, असं विधान शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
. “शिवसेनेचा मुख्यमंत्री बनण्यासाठी २५ वर्षांपासून राज्यात पूजा झाली आहे. २५ वर्ष मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहावेत अशी विनंतीही सर्वांनी केली आहे. सुप्रियाताई मुख्यमंत्री झाल्यास कधी होतील, कोणत्या परिस्थितीत होतील हे आज मी काही बोलणार नाही. त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत असेल तर रश्मीताई सज्ज आहेत. त्यांचा राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास आहे. सुप्रियाताईंचा मुख्यमंत्रीपदासाठीचा नंबर २५ वर्षांनंतर लागावा ही ईश्वर, अल्लाहकडे प्रार्थना”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.






