महाराष्ट्रातील किळसवाणं राजकारण, राज ठाकरे म्हणाले, सुरूवात शरद पवारांनी केली व शेवटही त्यांच्यापाशीच झाला…

0
33

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावरच निशाणा साधत जुना इतिहास बाहेर काढला आहे.

‘जे झालंय ते अत्यंत किळसवाणं आहे. महाराष्ट्रातल्या जनमताचा कानोसा घेतला तर प्रत्येक घरात शिव्या ऐकायला मिळतील. हा मतदारांचा घोर अपमान आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल मेळाव्यात बोलणार’, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

‘या सगळ्या गोष्टींची महाराष्ट्रात शरद पवारांनी सुरूवात केली. त्यांनी पहिला पुलोदचा प्रयोग केला 78 साली, तेव्हा काय केलं? त्याआधी महाराष्ट्रात असं कधी झालं नव्हतं. या सगळ्या गोष्टींची सुरूवात पवार साहेबांकडून झाली शेवट पवार साहेबांकडून झाला’, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.