चांदणी चौक उड्डाणपूल लोकार्पण सोहळा पुणे : पुण्यात चांदणी चौकाच्या उड्डाणपुलाचा लोकर्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. “या कार्यक्रमाला येण्याची खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येण्याची इच्छा होती. कारण ते सुद्धा एकदा या इथल्या वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यानंतर लगेच त्यांनी आढावा बैठक घेतली होती”, असं अजित पवार म्हणाले.
अलिकडे रुसून गेले, फुगून गेले, तसंच झालं, आता ते काम करत आहेत, राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांचं चांगलं काम सुरु आहे. त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस होते एका बाजूला, दुसऱ्या बाजू मोकळी होती. मी आता तिथे जाऊन उभा राहिलो. आम्ही दोघंही त्यांच्याबरोबर आहोत. त्यात चुकलं काय? राज्याचा सर्वांगिण विकास होत असेल, केंद्रातून नितीन गडकरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पैसे देत असतील तर का पैसे घ्यायचे नाहीत? का राज्याचा विकास करायचा नाही?”, असा सवाल अजित पवारांनी केले.
मुख्यमंत्री हे पद वेगळंच आहे. त्यांना तो सगळा अधिकार आहे. आम्ही दोघांनी बैठका घेतला तरी अंतिम निर्णय त्यांचाच आहे. तरीदेखील कोल्ड वार चाललंय. आता कुठे विरोधी पक्ष झाले आणि त्याना कुठे कोल्ड वॉर दिसलं कुणाला माहिती”, असं पवार म्हणाले.
एकाला वाटतं की या दोन उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्रीपदाच्या एका खुर्चीवर डोळा आहे. अरे आम्ही काय बेअक्कल आहोत काय? खुर्ची एक असेल तर दोघांचा डोळा ठेवून कसं चालेल? आणि ती खुर्ची भरलेली आहे ना? व्यक्ती बसलेली आहे. मला हे खरंतर काढायचं नव्हतं. पण काय होतं, आम्ही बोललो नाही तर एकच बाजू लोकांना दिसते, दुसरी बाजू दिसत नाही”, अशा शब्दांत अजित पवार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.