अहमदनगर महापालिकेच्या कचरा गाडीने घेतला एकाचा बळी,वाहतूक शाखेचा निष्क्रिय कारभार!

0
2305

अहमदनगर मध्ये महत्वकांक्षा असणारा उड्डाणपुलाचे काम सुरू आहे मात्र या उड्डाण पुलामुळे वाहतूक कोंडी आणि अनेकांचे जीव जाण्याच्या घटना घडत आहेत.उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक अन्य ठिकाणी वळवण्यात आलेली आहे, सक्कर चौक या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सदर वाहतूक ही विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या समोरून वळविण्यात आली आहे त्यामुळे अनेकदा काही अपघात होत असतात.

यातच एक घटना घडली आहे वाहतुकीचे नियोजन नसल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला दुचाकी वरून हा व्यक्ती जात असताना मनपाच्या कचरा गाडीने त्याला धडक दिली व अपघात झाला महानगरपालिकेच्या वतीने दिवसभर घंटागाडी फिरत असते आणि हीच घंटागाडी एका व्यक्तीसाठी शेवटची घंटा वाजवून गेली.

पाथर्डी तालुक्यातील वाळुंज येथील अशोक बाबुराव शिंदे व त्यांचा मित्र अनिल नामदेव शेळके (रा.बँक कॉलनी, पाथर्डी) हे दोघे हिरो होंडा पॅशन मोटारसायकलवर कामानिमित्त नगर मध्ये आले होते. ते रस्ता वळविला आहे तेथे वळण घेत असताना महापालिकेच्या कचरा वाहणाऱ्या कंटेनर चालकाने कंटेनर जोरात चालवून शिंदे यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. शिंदे हे कंटेनरच्या चाकाखाली सापडून चिरडले गेले, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे मित्र अनिल शेळके हे या अपघातातून सुदैवाने बचावले आहेत.मयत शिंदे हे होमगार्ड होते.