डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले ,कार्यकर्त्‍यांना दमबाजीची भाषा झाली तर जशासतसे उत्‍तर..

0
19

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने जिल्‍ह्यातील पदाधिकारी, बुथप्रमुख, शक्‍तीकेंद्र प्रमुख यांची एकत्रित बैठक राहुरी येथे संपन्‍न झाली. या बैठकीला महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील प्रदेश महामंत्री विजयराव चौधरी, संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्‍हा सहकारी बॅकेंचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, डॉ.सुजय विखे पाटील, आ.मोणीका राजळे, वैभव पिचड, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष विठ्ठलराव लंघे, दिलीप भालसिंग, शहर जिल्‍हाध्‍यक्ष अॅड.अभय आगरकर, महिला जिल्‍हाध्‍यक्षा अर्चना थोरात, कांचन मांढरे, जेष्‍ठनेते सुभाष पाटील, नानासाहेब पवार, नितीन दिनकर, अरुण मुंढे, सत्‍यजीत कदम, बाबासाहेब वाकळे, भैय्या गंधे आदि याप्रसंगी उपस्थित होते.

डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, विधानसभा निवडणूका जिंकायच्‍या असतील तर, सर्वांना मोठे मन ठेवावे लागेल. राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार आणण्‍यासाठी प्रत्‍येक आमदारा आपला महत्‍वाचा आहे. लोकसभा निवडणूकीत केवळ अपप्रचार झाला. मागील पाच वर्षात केलेला विकास अवघ्‍या दोन महिन्‍यात कुठे वाहून गेला हेही समजले नाही. सत्‍ता आली तरच कार्यकर्ते जिवंत राहतील यासाठी आपला लोकप्रतिनिधी महत्‍वाचा आहे. महायुती सरकार आले तरच सामान्‍य माणसाला न्‍याय मिळेल, विकासाची कामे मार्गी लागतील, कोन काय भाषणबाजी करतयं याला माझ्या दृष्‍टीने महत्‍व नाही, मात्र कार्यकर्त्‍यांना दमबाजीची भाषा झालीच तर जशासतसे उत्‍तर देण्‍यास मागेपुढे पाहू नका. तुमच्‍या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे असे त्‍यांनी कार्यकर्त्‍यांना आश्‍वासित केले.