मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्या वादात मध्यस्थी केली. यानंतर रवी राणा यांनी ५० खोके आणि गुवाहाटी दौऱ्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शब्द मागे घेतले. तसंच रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण आता बच्चू कडू यांचा वेगळाच सूर असल्याचे दिसून आले. वादावर स्पष्टपणे न बोलता बच्चू कडू हे आता आपली भूमिका कार्यर्त्यांच्या मेळाव्यातून जाहीर करणार आहेत