नगर कल्याण रस्त्यावर भाळवणी जवळ तीन वाहनांचा भीषण अपघात, सहा जण ठार

0
22

अहमदनगरः-नगर कल्याण महामार्गावर उस वाहतुक करणारा ट्रक्टर व ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांचा ढवळपुरी फाटया नजीक आज बुधवारी पहाटे २ . ३० वाजता भिषण आपघात झाला असून यात ६ जण जागीच ठार झाले.

पाच मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात तर एकाचा अहमदनगर येथे उपचार चालू असताना मृत्यु झाला. सहायक पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ व टिम घटना स्थळी दाखल झाली असून अपघात ग्रस्ताना तातडीने मदत करण्यात आली. आपघात ग्रस्त वाहने बाजुला केली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. दरम्यान अपघात ग्रस्तांची ओळख पटविण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले.

अपघात इतका भीषण होता, की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भयानक घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातातील जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.