मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे सभा घेतल्या नंतर भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. शिवसेनेची सभा म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न आहे. विधानसभेला युती नसती तर शिवसेनेचे पंचवीस आमदारही निवडून आले नसते अशी टीका भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केली. तसंच, ‘गटारातील बेडूक’ म्हणून महाजन यांनी शिवसेनेचा उल्लेखही केला.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बीकेसीमध्ये सभा पार पडली. यासभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंच्या टीकेला गिरीश महाजन यांनी उत्तर देताना जीभ घसरली.आम्हाला जनतेनं पाठिंबा दिला सर्वाधिक जागा दिला आहे. मोदींवर यांना बोलण्याची गरज नाही. यांची लायकी आहे. हे गटारतले बेडूक आहात, अशी टीका महाजन यांनी केली.
‘शिवसेना सत्ता लंपट आहे. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवून 4 खासदार निवडून आणावे. विधानसभेला युती नसती तर शिवसेनेचे पंचवीस ही आमदार निवडून आले नसते’ अशी टीका महाजन यांनी केली.