कर्नाटकचा निकाल…मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया..

0
29

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव केला. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी हा पराभव भाजपाच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं. ते रविवारी अंबरनाथमध्ये आले असताना पत्रकारांशी बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “मी मागे माझ्या भाषणात म्हटलं होतं की, विरोधी पक्ष हा जिंकत नसतो, तर सत्ताधारी हरत असतात. मला वाटतं हा पराभव स्वभावाचा पराभव आहे, वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करू शकतो अशा विचाराचा जो असतो त्याचा हा पराभव आहे, असं मला वाटतं.” “जनतेला, लोकांना कधीही गृहित धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं. कर्नाटक निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले,