केंद्र सरकारच्या योजनेतून नगर शहराला मिळणार ५० इलेक्ट्रीक बस…

0
32

केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत देशभरात पीएम ई-बस सेवा योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत देशातील 169 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यात पाच लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये नगर शहराचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेतून नगर शहराला 50 पर्यंत ई-बसेस उपलब्ध होऊ शकणार आहेत. त्यासाठी महापालिका प्रकल्प अहवाल सादर करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्राच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रकल्प अहवाल तयार करून तो राज्यस्तरीय समितीकडे सादर करावा लागणार आहे. राज्यस्तरीय समितीच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारच्या समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. नगर महापालिकाही प्रकल्प अहवाल तयार करून सुमारे 50 बसेसची मागणी करणार असल्याचे आयुक्त जावळे यांनी सांगितले.