राज्यसभा निवडणुकीवरुन महाराष्ट्रामध्ये मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. अखेरीस 9 तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला आहे. महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले आहे. पण, अपक्षांची मत फुटलं असल्याची समोर आलं आहे.
भाजपचे संख्याबळ 123 इतकी झाले होते. राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपकडे 28 मते राहत होती. पण, पियूष गोयल यांना 48 मतं मिळाली आणि अनिल बोंडे यांनाही 48 मतं मिळाली. त्यानंतर पहिल्या पसंतीची 27 मतं ही धनंजय महाडिक यांना मिळाली आहे.तर महाडिक यांच्याविरोधात उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना 33 मतं मिळाली आहे. त्यामुळे अपक्षांची 9 मतं फुटली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. धनंजय महाडिक हे 41 मतं घेऊन विजयी झाले आहे. तर संजय पवार यांना 33 मतं मिळाली आहे.






