मनसेचा गौप्यस्फोट…तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव!

0
871

राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा शिवसेना मनसे युतीचे तर्कवितर्क लावले गेले. मात्र, तशी युती वास्तवात उतरू शकली नाही. याबाबत कुणी कुणाला टाळी द्यावची हे वक्तव्य चांगलंच गाजलं. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही भाष्य केलं होतं. आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना-मनसे युतीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला. ते गुरुवारी (६ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संदीप देशपांडे म्हणाले, “२०१७ मध्ये मी आणि स्वतः संतोष दुरी आम्हाला मातोश्रीवर बोलावण्यात आलं होतं. आपल्याला एकत्र निवडणूक लढवायची आहे असं सांगण्यात आलं.”“त्यावेळी आमच्याशी बोलणी केली आणि आम्हाला हेही सांगण्यात आलं की, आम्ही भारतीय जनता पार्टीशी लग्न मोडतो आणि त्यानंतर आपण नवीन लग्न करू. मात्र, त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं,” असा गंभीर आरोप संदीप देशपांडेंनी केला.