मुख्यमंत्रीपदासाठी दगाबाजी करून महाराष्ट्राच्या जनादेशाचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना पहिली शिक्षा राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आहे, आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सरकार शंभर टक्के बरखास्त होईल तसेच पश्चिम बंगाल मधीलही सरकार बरखास्त होईल असा दावा भाजप नेते माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे.
केंद्रातल्या भाजप सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सांगली येथे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व कोल्हापूरचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्याला सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेश खाडे उपस्थित होते.
मुख्यमंत्रीपदासाठी दगाबाज करून महाराष्ट्राच्या जनादेशाचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना पहिली शिक्षा राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदारांनी दिली आहे. आता राष्ट्रपतीपदाचा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सरकार शंभर टक्के बरखास्त होईल, त्यानंतर पश्चिम बंगाल मधीलही सरकार बरखास्त होईल.