शिंदे गटाबाबत मोठं विधान,शिंदे गटातील खासदारांना भाजपाच्या तिकीटावर उभं राहायचं..

0
14

पुढीलवर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यात ४८ लोकसभेच्या जागा आहेत. त्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गटाने कंबर कसली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे गटाबाबत मोठं विधान केलं आहे. “शिंदे गटातील खासदारांना भाजपाच्या तिकीटावर उभं राहायचं आहे,” असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “यापूर्वी आम्ही ज्या लोकसभेच्या जागा लढवल्या होत्या, तेथील नेत्यांशी चर्चा करत आढावा घेण्याचं काम केलं,” असं जयंत पाटलांनी सांगितलं.
तसेच, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले खासदार शिंदेंच्या तिकीटावर उभे राहण्यास इच्छूक नाहीत. बऱ्याच लोकांना भाजपाच्या तिकीटावर उभारण्याची इच्छा आहे. त्यामुळे शिंदे गटाची पंचायत झाली आहे. तसं झालं तर, एकनाथ शिंदेंबरोबर असलेला शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडं जाण्याची शक्यता आहे,” असं जयंत पाटलांनी म्हटलं